हा रडीचा डाव नाही

हो नाही करता करता भारतानं वर्ल्डकप जिंकला. नुसताच जिंकला नाही. दिमाखात जिंकला.
आपण पाकिस्तान विरुद्धची म्याच जिंकली तेव्हाच माझ्या मनात -

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकार घेवू लागल्या होत्या. हि सगळी कविता लिहित असताना एकीकडे अम्पायरनं बाद द्याच्या आधीच मैदानातून बाहेर जाणारा सचिन आठवत होता, आफ्रिदीचा अगदी झेपावत घेतलेला झेल आपण टप्पा पडण्यापूर्वी घेतला कि टप्पा पडल्यानंतर हे आपल्याला सांगता येणार नाही, हे अगदी निरागस बाळासारख सांगणारा नेहरा आठवत होता आणि दुसरीकडं मैदानातल्या अम्पायरनं बाद दिल्यानंतरही तिसरया अम्पायरच्या निर्णयाची वाट पहात मैदानात ताटकळत उभे रहाणारे इतर देशांचे कितीतरी खेळाडू मी पहात होतो. आणि या हिंदवी मातीच्या इमानीपणाची मला अधिक तीव्रतेन जाणीव होत होती.

अंतिम सामन्यात भारताचे दोन मोहरे झटपट बाद केल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी केलेला जल्लोषही आठवतोय आणि गंभीर – धोनीची जोडी फुटेना तेव्हा केवळ यांच्यावर दबाव आणावा एवढ्याच हेतूने केलेले कितीतरी अपील आठवताहेत.

१९९६ साली उपांत्य सामन्यात विनोद कांबळी रडला. २०११ श्रीलंका रडल्यासारखी दिसली नाही पण मनोमन रडत होती.

बस्स. २०१५ च्या वर्ल्डकप साठी धोनीच्या संघाला मनःपूर्वक. शुभेच्छा.

होय मी आजच सांगतोय. २०१५ चा वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत.

२०११ च्या विजयानिमित्त सचिनसह भारतीय संघाला अर्पण.


About this entry