क्रिकेटमधली अंधश्रद्धा

अंधश्रद्धा किती प्रकारच्या असतात !!!

साप दुध पितो.
नागाच्या डोक्यावर मनी असतो.
सर्प धनाचे रक्षण करतो.
सापाच्या अंगावर केस असतात.
मनोहर जोशींचा गणपती दुध पितो.
वडाच्या झाडावर भुतं रहातात.

अशा एक ना अनेक अंधश्रद्धा.

अशीच एक अंधश्रद्धा क्रिकेटमध्येही आहे. ती म्हणजे -

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘

अगदी एवढयात पार पडलेल्या विश्व चषकाच उदाहरण घ्या ना. उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यात आपण सचिनच्या शतकांच्या शतकाची आतुरतेनं वाट पाहत होतो. त्यासाठी मनोमन प्रार्थनाही करत होतो. पण आपली इच्छा काही फळाला आली नाही. सचिनचं शंभरावं शतक या विश्वचषकात पाहण्याचं भाग्य आपल्या नशिबी नव्हतं. पण पाकिस्तानला धूळ चारतानाच आपण श्रीलंकेलाही आस्मान दाखवलं. आणि मोठ्या दिमाखात विश्वचषक आपल्या घरी आणला.

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘ हे मी अनेकांच्या तोंडून ऐकलय. काही वेळा मी स्वतःही अनुभवलंय.

अगदी कालचीच घटना.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोची टस्कर्स सामना. सचिनचं २०-२० मधलं पाहिलंवहिल शतक. मुंबईचा १८२ असा मजबूत स्कोर. मुंबईन आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकलेले आणि कोचीला अजून खातं उघडायचं होतं. म्हणलं आता मुंबई जिंकणारच. पण कसलं काय कोचीन १ षटक राखून सामना जिंकला. झालं -
‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘ हि अंधश्रद्धा अधिक गडद झाली.


About this entry