कधी काय होईल सांगता येत नाही.
कधी नव्हे ते कांद्याचे भाव वाढले आणि शेकड्यात खेळणारा शेतकरी एकदम लाखात लोळायला लागला.
तेव्हा अनेकांच्या तोंडी, ” लई बुवा नशीब गड्याचं!!!!” असे उद्गार ऐकले.
ह्याच कांद्याचे भाव पार साठ आठ रुपयावर आले आणि जेव्हा भर बाजारात आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली तेव्हा पुन्हा अनेकांच्या तोडी, ” नशीबच खोटं बुवा गड्याच. ” असेही उद्गार ऐकायला मिळाले.
मागे मी लिहिलेल्या
या लेखावर मला मनोहर या एका मित्राची प्रतिक्रिया आली होती. ती अशी –
” सातत्य म्हणजे काय रे भाऊ ?”
उगाच कुणालातरी सारखंच फटकारायचं, हे मला जमत नाही. आणि वरील प्रतिक्रियेवर काय उत्तर द्यावं हे न सुचल्यानं मी मुग गिळून गप्पं बसलो. तेव्हा कुठे ” मुग गिळून गप्पं बसणे ” या म्हणीचा अर्थ मला कळला.
पण मी शांत बसलो नव्हतो. संधीची वाट पहात. या प्रतिक्रियेला उत्तर देण्याची संधी मला आज मिळाली.
ती संधी आज मिळाली.
भारत – इंग्लंड म्याच.
आज बहुधा सुखाचा दिवस होता.
सचिनची सेन्चुरी.
भारताचा ३३८ धावांचा डोंगर.
म्हणालं इंडिया जिंकणार.
पण कसलं काय नशीबच भिकार आमचं.
Strauss नं धरलीना लावून. इंग्लंड २ बाद २८०. सगळ्या आशा मावळल्या होत्या.
धोनी खूप यशस्वी कर्णधार असला तरी काही वेळा तो खूप नशीबवान ( लकी ) आहे असंही वाटतं.
पहा ना !!!!!!!
इंडिया हारणार म्हणता म्हणता झहीरन दोन आणि भज्जीन एक विकेट घेतली. आणि झालं ” जितेगा भाई जितेगा, इंडियाही जेतेगा !!! ” चा घोष सुरु झाला.
२० बॉल ३८ रन.
म्हणलं आतातर शंभर टक्के जिंकणार.
पण कसलं काय ? शेवटी टाय.
आता सांगाल मनोहरजी, ” सातत्य कशाला म्हणता येईल ते ? ”
अहो जिथं………….अखंड………..अविरत……….तिन्ही प्रहर……….चालणाऱ्या आमच्या श्वासाचं सातत्य आम्हाला राखता येत नाही. तिथ आपण सातत्याची भाषा करावी कशाला. खेळात हार – जीत होत असते.
आपण फक्त आपले प्रयत्न करावेत………….. बस्सं!!!!!
खरतर हातघाई या परिस्थितीला कारणीभूत ठरली आणि शेवटी प्राणांवर आले ते बोटांवर निभावले.