एक होता पाऊस

पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो  आवडतोच आवडतो…………….पण छोट्यांनाही आवडतो…………..संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ‘ एक होतं वांग ‘ हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच Continue reading

राक्षसपुरचा राक्षस

मुलं राक्षसाला घाबरतात असं कुणी म्हणत असेल तर ते मला फारसं पटणार नाही. मुलं राक्षसाला घाबरली असती तर त्यांनी राक्षसाच्या गोष्टी कान देऊन ऐकल्या नसत्या आणि अभ्यासाची पुस्तकं डोळ्यासमोर धरायची टाळाटाळ करणारी मुलं अशा गोष्टींची पुस्तकं तासंतास डोळ्यासमोर धरून बसलीही नसती.

त्यातूनही थोडीफार भीती असतेच मुलांना राक्षसाची. पण त्या भितीलाही एक वय असतं. अशी राक्षसाची थोडीफार भीती बाळगणाऱ्या मुलांच्या मनातूनही राक्षसाची भीती दूर व्हावी म्हणून लिहिलेली हि कविता.

संपूर्ण ‘ देवबाप्पा ‘

खरंतर मला असं अर्धवट लिहायला आवडत नाही. पण काल काय झालं होतं माहित नाही. काही केल्या माझी कविता लोड होत नव्हती. आजही ऑफिसहून आल्यानंतर दोन तीन वेळा प्रयत्न केला. पण काही जमत नव्हतं. बहुधा स्पीडचा प्रोब्लेम असावा.  शेवटी आत्ता कविता लोड झालीय. हि संपूर्ण कविता तुम्हाला नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतोय.

पण हे छोट्या मुलांसाठी जे लिहितोय ते केवळ त्यांच्यासाठीच. मोठ्यांनी हे सारं छोट्यांच्या कानावर घालावं. त्यातून त्यांच्यावर काही संस्कार व्हावेत. हीच मनापासून इच्छा.

*********************************************************************************

शाळा संपली कि सुट्टी लागते. मुलांना खूप आनंद होतो. नुसत्या उनाडक्या करत फिरतात ती. दोन महिने आई – बाबा, आज्जी – आजोबा, मामा – मामी साऱ्या साऱ्यांना नकोसे करून टाकतात. कधी एकदा ही कार्टी शाळेत जातील आणि घर शांत होईल असं वाटत असतं घरातल्या सगळ्यांना. पण त्यांचा मन कुठं कळतं आपल्याला ?

खरंतर मुलांनाही सुट्टीचा कंटाळाच आलेला असतो. कधी एकदा शाळा सुरु होते आणि कधी एकदा नवा गणवेष, नवी वह्या पुस्तक घेऊन शाळेत जातो आणि आपल्या मित्र – मैत्रिणींना सुटीतल्या गंमती जंमती सांगतो असं होऊन गेलेलं असतं त्यांनाही.

झालं!!!!!!!!!!!!!

सुट्टी संपते. शाळा सुरु होते. पण महिन्या दोन महिन्यातच मुलांना पुन्हा शाळेचा कंटाळा येऊ लागतो. वाटतं, काय हे ? रोज तेच तेच. शाळा, शिकवणी, अभ्यास, इतिहास, भूगोल अगदी चक्रावून जातात मुलं.

अशीच हि ह्या कवितेतली मुलगी. तिला शाळेचा खूप खूप कंटाळा आलाय. तिला वाटतंय आपल्यापेक्षा देवाचं आयुष्य खूप मजेचं आहे. शाळा नाही, पाटी नाही, अभ्यास नाही, शिकवणी नाही कि संध्याकाळी शुभंकरोतीही म्हणायची नाही. ही सगळी शोकांतिका देवालाच सांगताना ती म्हणते –

देवबाप्पा, देवबाप्पा
बरं आपलं तुझं आहे
अभ्यासाचं पाठीवरती,
तुझ्या कुठं ओझं आहे.

हि कविता तुम्ही तुमच्या मुलांना वाचून दाखवलं तेव्हा त्यांना –

पण ही कविता म्हणजे आपली गंमत बरं. शाळेत जायला हवंच खरं.

आणि नुसतं शाळेत जाऊनही नाही भागायचं. अभ्यासही करायला हवा.

हे सांगायला विसरू नका.

मातृदिन. ९ मे

“चला चला चला. खेळत काय बसलात ? इकडे या सगळे.”
“काय म्हणालात. आम्हाला आमचा खेळ सोडून एवढ्या तातडीने का बोलावलत ?”
“सांगतो. सांगतो. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला ?”
” नाही ना ? सहाजिकच आहे. लहान आहात तुम्ही अजून. पण तरही हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कारण तो एक आपल्या संस्काराचा भाग आहे. म्हणून तर तुम्हाला एवढ्या तातडीने बोलावलंय.”
“हं ! तर मुलानो आज आहे मातृदिन. ९ मे . लक्षात ठेवाल ना यापुढे ! “
काय म्हणालात ? मातृदिन म्हणजे काय असतं ?”
मुलांनो. मातृदिन म्हणजे आईची थोरवी गाण्याचा दिवस. आईच्या मोठेपणाच स्मरण करण्याचा दिवस. आई आपल्यासाठी राबते. झिजते. हाडाची काड करते. पण आपण कधी तिचे आभार सुद्धा मानत नाही. तिच्यावर कधी सुखाचे चार शब्द उधळत नाही. जगभरातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईविषयी कृतन्यता व्यक्त करावी म्हणून जगभरात आज हा दिवस साजरा केला
जातो. “
“म्हणजे काय करायच अक्कलराव ? असं अजिबात विचारू नका. “
“करायचं म्हणलं तर खूप काही करता
येण्यासारखं आहे. खूप काही करू नका. फक्त आज आईला त्रास द्यायचा नाही. म्हणजे इतर दिवशी द्यायचा असं नव्हे. पण आज मात्र तिला थोडाही त्रास द्यायचा नाही. तिच्याजवळ कुठलाही हट्ट करायचा नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि तिची गोड पापी घेवून तिचं असंच अखंड प्रेम लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची.”
“मुलांनो आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी
कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस.”
“आई जशी आपल्याला असते तशीच
पाखरांना असते……..वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गाधडयालाही असते.”
“आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते. बस्स ! एवढंच लक्षात ठेवा आणि यापुढे आईला त्रास देणं बंद करा .”
“कराल ना
एवढ ?”
“सगळेच हो म्हणाले. चला ! मला आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो आहे. अरे पण असे पळताय कुठे सगळे ?”

“आईच्या कुशीत शिरायला ? ठीक आहे. ठीक आहे. चला मी हि निघालो माझ्या आईच्या कुशीत शिरायला.”


चित्र आणि खरेपणा

चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला ?

                      व्वा ! चित्रं या  विषयाबरोबर काय सरसावून बसलात सगळेच . हे वरचं चित्रं कुणी काढलं असेल असं वाटतंय तुम्हाला ?
                     माहित नाही म्हणताय. सांगतो.
                     अक्कलरावांच्या शेजारी एक  जयुराणी राहते. हो ! हो ! तोच तो राजा. जयुराणी हे त्याचं लाडाच नाव. खरं नाव जयेश. तर चित्रकला हा त्याचा   खूप आवडता विषय. असं असला तरी पठ्ठ्या वर्षभरात कधीही चित्रकलेची वही आणि रंग हाती घ्यायचा नाही. वर्ष संपता संपता चित्रकलेचे शिक्षक  चित्रकलेची वही पूर्ण करायचा आग्रह  करायचे. जयुराणीला आलेलं टेन्शन. वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली आणि अशात अभ्यास सोडून चित्रकलेची  वही पूर्ण करत कसं बसायचा ? बरं चित्रं तरी किती काढायची ! एक  दोन नव्हे…………… चक्कं वीसहून अधिक. चित्रांचे विषयसुद्धा असेच पेचात पाडणारे . रक्षाबंधन, बस थांबा, पावसाळ्यातील एक दिवस, स्वातंत्र्यदिन …………एकपेक्षा  दुसरा  कठीण .
                    जयुराणी गेली बाबांकडे. सारं काही बाबांना सांगितल आणि  म्हणाली, ” बाबा  मला  काही  चित्रं  काढून  द्या  ना .”
                    जयुराणीच्या बाबांनाही चित्रं काढायला आवडायचं. त्यांनी लगेच एक दोन दिवसात जयुराणीला काही चित्रं काढून दिली. त्यातलंच एक  ‘ पावसाळ्याच्या दिवसातलं चित्रं.’
                    झालं. चित्रकलेची वही पूर्ण झाली. जयुराणीनं ती त्याच्या शिक्षकांना दाखवली. आणि ‘ पावसाळ्याच्या दिवसातल ‘ ते चित्रं पाहताच सर  म्हणाले, “हे  चित्रं  तू  काढलस  ?”
                    “नाही  सर. हे चित्रं माझ्या बाबांनी काढलंय.” सरांनी  त्या  चित्राला दहा पैकी सात मार्क दिले .
                    जयुराणीनं घरी आल्यावर बाबांना हे सारं सांगितलं. खरं बोलल्याबद्दल बाबांनी जयुराणीला शाब्बासकी दिली. पण  जयुराणीसमोर  प्रश्नचिन्ह. त्याची शंका. त्यानं बाबांना विचारली, “ पण बाबा सरांनी तुम्ही एवढ छान काढलेल्या चित्राला सातच मार्क का दिले  ?”
                    “हे बघ बेटा. खरं तर सरांनी त्या चित्राला शून्याच मार्क द्यायला हवे होते. पण त्यांनी सात मार्क दिले ते चित्राला नव्हे तर तुझ्या खरेपणाला .” बाबांनी जयुराणीला समजावून सांगितलं.
                    “पण एक लक्षात ढेव, यापुढे असं कधीच करायचं नाही. तुझं काम तूच  करायचं .”

                     जयुराणीनं बाबांना पुन्हा असं न करण्याचं वचन दिलंय. आणि तुम्हीसुद्धा असं कधीच वागणार नाही याची मला खात्री आहे. चित्रं   काढायला जमत नसतील तर उन्हात खेळण्या ऐवजी थोडी चित्रं काढण्याचा सराव करा. 

शाळेचा रिझल्ट

    काय मुलांनो, परवाची गोष्ट वाचलीत ना ?

आवडली कि नाही ?
खूप खूप आवडली.
बहोत अच्छे !
हो पण तुमच्या निकालाचा काय ? निकाल लागले असतिल ना आता सगळ्यांचे ?
सॉरी ! आपण ‘ निकाल लागला असेल ‘ या ऐवजी ‘ रिझल्ट लागला असेल ‘ असा म्हणू या. कारण ‘ निकाल लागणे ‘ हं शब्दप्रयोग ‘ वाईट होणं ‘ या अर्थाने हि वापरला जातो. म्हणून आपण ‘रिझल्ट लागला ‘ असेल असंच म्हणू या.
हं ! मग लागलेत ना सगळ्यांचे रिझल्ट. कुणाकुणाला किती टक्के मार्क मिळाले.
८० टक्के, ९० टक्के, ९७ टक्के, ९१ टक्के, ९४ टक्के ……………. बापरे ! एवढे टक्के ? कमाल आहे तुमची.
काय ? ढमप्याला फक्त ५० टक्केच मार्क मिळाले. आणि म्हणून तो रडतोय.
ढमप्या हे बघ असं रडायचं नाही. सगळे लक्ष देवून ऐका. हे पहा मुलांनो मार्क चांगले पडायला हवेत हे खरं. त्यासाठी खूप अभ्यास करायला हवा हे हि खरं. पण अगदीच पुस्तकी किडा व्हायला नको काही. अभ्यासाचा आनंद घेता आला पाहिजे.


आणि
ढमप्या तुला मार्क कमी पडले म्हणून तू काही लगेच परवाच्या गोष्टीतल्या कोकिळे सारखं रडत बसायला नको काही. मार्क आणि बुद्धिमत्ता यांचा एकमेकांशी संबंध आहे हे जरी खरं असलं तरी, कमी मार्क म्हणजे ढ गोळा असं नव्हे काही. तू गेल्यावर्षी खूप खेळला असशील. हो कि नाही ?

मग ! असं नाही करायचं. आता दोन महिने खूप खेळ. पण एकदा शाळा सुरु झाली कि मग रोज फक्त अर्धाच तास खेळायचं. आणि खेळून आलं कि मन लावून अभ्यास करायचा. हो हो रविवारी खेळायचं थोडं जास्त. मग बघ तूच मला पुढच्या वर्षी सांगशील ,” अक्कलराव मलासुद्धा ८० टक्के मार्क मिळाले. “
ऐकशील ना माझं ? ओ. के. ! पळ तर मग खेळायला. मस्त मजा कर.

प्राण्यांच्या शाळेचा निकाल.

आपल्या शहरात मुला मुलींच्या शाळा असतात. तशीच जंगलातही प्राण्यांची एक शाळा होती. त्यांची शाळा वाडाच्या एका मोठ्ठ्या झाडाखाली भरायची. सात माणसांच्या कवेत मावणार नाही इतकं ते झाड मोठं होतं. सारे प्राणी त्या झाडाखाली जमायचे. मन लावून शिकायचे. गुरुजींचा नाव होतं पोपटराव. उंट, हत्ती, घोडे, गाढव, चिमण्या, कावळे, कोकीळ, मैना, लांडगे, कोल्हे सारे सारे त्या शाळेत जायचे. मन लावून अभ्यास करायचे. त्यांची लेखी परिक्षाही व्हायची. आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा परीक्षेचा निकालही लागायचा.
मुलांनो कालच त्या सार्यांच्या परीक्षेचा निकाल लागला. सगळ्यांचे आई बाबा सोबत होते. सगळे पास झाले………….नापास झाली ती फक्त कोकिळा.

सगळे पास झाले म्हणून कोकिळेला फार आंनंद झाला. पण आपण नापास झालो याचंही फार वाईट वाटलं. तिचं उडणंबागडणं, हसणंगाणं सारं बंद झालं

दोन दिवस झाले. चार दिवस झाले. पण जंगलात कुठेही कोकिळेचा आवाज ऐकू येईना. पास झालेल्या साऱ्यांची खूप दंगामस्ती चाललेली. आपण सारे पास झालोत या आनंद सोहोळ्यात सारे हरवून गेलेले. पण हळू हळू त्यांच्या लक्षात आला कि,” अरे आपण सारे मस्त मजेत दंगा मस्ती करतो आहोत. पण कोकिळेचा आवाज कोठूनही ऐकू येत नाही. आपण खेळतो आहोत पण आपल्याला तिच्या गाण्याची संगत नाही.”सहजिकच साऱ्यांना खूप खूप चुकल्या चुकल्या सारखा वाटत होतं.

चौथ्या दिवशी साऱ्यांनी आपला खेळ दिला सोडून आणि सारे गेले कोकिळेच्या घरी. तर कोकिळा अजूनही रडत बसलेली. रडून रडून तिचे डोळे लाल झालेले. चेहरा कोमेजलेला. साऱ्यांना खूप वाईट वाटलेलं तिची अशी अवस्था पाहून. प्रत्येकजण आपापल्यापरीनं तिची समजूत काढू लागला.

मैना म्हणाली,” ये रडूबाई, असं रडून काय होणार ? चलं पुढच्या वर्षी खूप अभ्यास कर मग बघ तू नक्की पास होशील.”

माकड म्हणालं,” हे गानतपस्विनी, अशी रडू नकोस. हे बघ पुढच्या वर्षी मी मदत करीन तुला अभ्यासात. पण आता रडणं बंद कर पाहू.”

चिवचिव चिवचिव करत चिमणी म्हणाली ,” आत्याबाई. पुरे आता. दोघी मिळून खूप अभ्यास करू पुढच्या वर्षी. मग बघू तुम्ही कशा नापास होतंय ते.”

साऱ्यांचा एकाच दंगा चाललेला. शेवटी पंखामध्ये मान खुपसून रडत बसलेल्या कोकिळेला मान वर करावीच लागली. कसे बसे डोळे पुसत हमसून हमसून ती म्हणाली,” अरे माझ्या मित्रांनो कसं सांगू तुम्हाला. अरे, मी खंरच खूप अभ्यास करते रे. पण गणित, इंग्रजी या विषयातलं मला खंरच काही काळात नाही रे. खंरच मी कध्धी कध्धी पास होणार नाही.”

कोकिळेच म्हणणं साऱ्यांना पटत होतं. ती खरच खूप खूप अभ्यास करायची हेही साऱ्यांना माहित होतं. पण तिचं रडू तर थांबायलाच हवं होतं. रडून रडू तिचा गळा बसला तर तिचं गाणं आपल्याला पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही याची जाणीव साऱ्यांना होती. म्हणून पुन्हा पुन्हा सारे तिला समजावत राहिले. शेती साऱ्यांच्या समाधानासाठी कोकिलेन तिचं रडू आवरलं. अंधार पडू लागला होतं. हळू हळू सारे आपापल्या घरट्याकडे परतू लागले. पण जाता जाता साऱ्यांनी ठरवलं यातून काही तरी मार्ग काढायलाच हवा. पुढच्या वर्षी कोकिळा पास व्हायलाच हवी.

दोन दिवस साऱ्यांनी खूप खल केला. पण कोणाचंही डोकं चालेना. पण ठरल्याप्रमाणे सारे दोन दिवसांनी शाळेत जमले. सिंह महाराज म्हणाले,” हं ! सुचलाय का कोणाला काही मार्ग ?”

पण कोणीच काही बोलेना. सारे पडेल चेहऱ्याने बसलेले.गप…….. गप. सारं काही शांत.

महाराज माझ्याकडे आहे मार्गसगळ्यांच्या मागून आवाज आला. “अरे ! हा तर गाढवाचा आवाज .” असं म्हणत साऱ्यांनी मागे वळून पाहिलं. गाढवाला सारेच बुद्धू समजायचे . साहजिकच साऱ्यांनी त्याची खूप टर उडवली.

अरे सर्वात गोळा तू . आणि तू काय मार्ग दाखवणार ?” छद्मी हसत कोल्हा म्हणाला.

खामोश ! ” जंगलचा राजा सिंह गरजला.” कोल्हेमामा, आपण प्राणी आहोत. दुसऱ्याला स्वतःपेक्षा कमी लेखायला आपण काही माणसं नाही आहोत.”

गाढवदादा, सांगा बरं तुमचा विचार.” खजील झालेल्या गाढवाकडे पाहून सिंह म्हणाला.

सगळ्यांनीच टिंगल केल्यामुळे गाढव थोड बुजलच होतं. आपला विचार सारयांपुढे मांडवा कि मांडू नये या विचारात पडलं होतं. जंगलच्या राजानं गाढवाची हि द्विधा मनस्थिती ओळखली. गाढवाला धीर देत ते म्हणाले,” गाढवादादा असे घाबरू नका. मोकळ्या मानाने सांगा तुम्हाला काय वाटत ते.”

महाराज,” गाढव धीर करून बोलू लागलं. ” कसं आहे पहा. आपण सारेच थोडे बहुत माणसाळंलेले. तुमचेसुद्धा काही भाईबंद सर्कशीत, प्राणी संग्रहालयात असतात. माकड भाऊ काय, घोडेराव काय, मी काय, चिवूताई काय आम्हा साऱ्यांची माणसांच्या कडेकडेने उठबस असते. म्हणून आम्हा साऱ्यांना गणित, इतिहास, भूगोल या साऱ्या विषयातल थोडं बहुत कळतं आणि म्हणून आम्ही सारे पास होतो. पण कोकिळाताई काही माणसांच्या वाऱ्याला उभी राहत नाही. पण मानसं मात्र चोरून तिचं गाणं ऐकतात आणि गवई होतात. त्यांच्या संगीत शाळाही असतात. त्यात मोठ मोठ्या पदव्याही असतात. त्यामुळे कोकिळाताई साठी आपण संगीत हा विषय ठेवला तर ती नक्की पास होईल. तेही पहिल्या नंबराने. हो ! आता संगीतात मी पास होणार नाही पण कोकिळाताई नक्की पास होईल.”

गाढवाच्या या विनोदावर सारेच पोटधरून हसले.

व्वा ! काय मस्त मार्ग आहे. आमची यास संमती आहे.” सिंहराजाने गाढवाच्या तोडग्यावर राजकीय शिक्कामोर्तब केले. सारे कोकिळेच्या घरी गेले. कोकीळेसाठी संगीत हा विषय आणि त्यासाठी सिंहाचं मान्यता पत्र त्यांनी कोकिळेला दाखवलं. आणि मग कोकिळा पुन्हा आनंदाने गाऊ लागली.

अथक परिश्रम


मागे एकदा मंगेश तेंडूलकरांच्या विषयी मी लिहिलं होतं. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं कि,”त्यांनी चित्रकलेचं कोणतही शिक्षण घेतलं नाही. तरी आज ते एक आघाडीचे व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जातात.
मला सुद्धा दोन महिन्यापूर्वी या ब्लॉग विषयी काहीच माहित नव्हतं. त्यातलं कि ठो कळत नव्हतं. पण आज दोन महिन्यानंतर मला बर वाटेल असं काम झालय.
दोन महिन्यापासून तुम्हाला रुचेल असं लिहीयचा मनापासून प्रयत्न करतोय. पण माझ्या ब्लॉगचं
पान मात्र मला देखणं वाटत नव्ह्तं.
बाळ दिसायला छान असलं कि त्याच्याकडे पहावसं वाटत. त्याच्याशी खूप खूप
खेळावस वाटतं. पण त्याच्या नाकाला खूप शेंबूड असेल तर त्याची पापी काही घ्यावीशी वाटत नाही. तसंच माझ्या ब्लॉगचं पान कालपर्यंत काहीसं शेंबड होतं.
म्हणून शनिवारची एक मेची आणि आठवड्याची आजची अशा जोडून आलेल्या दोन्ही सुट्ट्या तुम्ही नेहमी पाहणार असलेलं हे पान
देखणं करण्यात घालवल्या. आणि आज संध्याकाळी मना सारख काम झालं तेव्हा सुटकेचा श्वास घेतला.
हे सारं तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच मुलांनो कि,” अथक परिश्रामाशिवाय काहीच शक्य नसता आणि अथक परिश्रम केले तर काहीच अशक्य नसतंहे तुम्हाला कळावं.
मग कराल ना अथक परिश्रम ?
छे ! मी प्रश्न कसला विचारतोय. मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा खूप खूप कष्टाळू आहात ते.
हो आणि तुमचा रिझल्ट लागेलच ना एकदोन दिवसात. त्यासाठी भेटेनच मी तुम्हाला एक दोन दिवसात.
पेढे घेवून या हं.
एक सांगायलाच हवं. आपल्या ब्लॉगच्या एक जाहिरात आहे. ती आहे जगभरातल्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठीकाम करणाऱ्या एका संस्थेची. तुमच्या खाऊतले थोडे थोडे पैसे साठवा आणि शक्य झालं तर त्या संस्थेला नक्कीमदत करा.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो


राग गेलाय ना तुमचा ?
मग ठीक आहे.
मला माहिती आहे आता तुम्ही सारे कुठे कुठे गावाला गेला असाल. कुणी मामाकडे, कुणी आत्त्याकडे, कुणी आजोळी तर कुणी आणखी कुठे. खूप खूप मजा करत असाल तिथे. मामाचं शेत असेल तर मग आणखिनच मजा येत असेल. तिथे ओढ असेल, मोटा उरल्या नाहीत आता कुठे बटन दाबलकी पाणी फेकणारी मोटार असेल, विहरीच पाणी पिकापर्यंत वाहून नेणारा पाट असेल, त्या पाटात पंख बुडवून अंघोळ करणारी पाखरं असतील, दुपारच्या रणरणत्या उन्हात आंब्याची गार सावली असेल, गाई – गुरं, शेळ्या – मेंढ्या असतील. रात्रीच्या शुभ्र चांदण्यात वाड्याच्या अंधारात टाकलेला घोंगड असेल आणि त्या घोंगड्यावर आकाशातल्या चांदण्या मोजत लोळणारे तुम्ही असाल.
तुम्हाला ते गाणं आठवतंय –

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो,

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेवून जी हो

तुम्ही म्हणाल अक्कलराव हे काय चालवलय तुम्ही ? मोट काय ? पाट काय ? घोंगड काय ? अहो, आम्ही फक्त टि व्ही पाहतो, विडीओ गेम खेळतो, कॉम्पुटरवर एकेक गेम खेळताना तर फार मजा येते. तुम्हाला यातलं काही माहिती आहे का अक्कलराव ? काय गेम असतात एकेक. रेसिंग काय, फायटिंग काय फार फार धम्माल येते.
मुलांनो अशा बैठ्या आयुष्यात मजा वाटते तुम्हाला. अरे हे तर तुमचं खेळण्याचा, बागडण्याच, हुंदडण्याच , आकाशात पाखरांसारखी मुक्त भरारी घेण्याचा वय. तुम्ही असा एका जागी बसून चालेल. अरे तुम्ही तर उद्याचं स्वप्नं आहात. तुम्ही तर उद्याचं भविष्य आहात. तुम्ही असा एका जागी बसून नाही चालणार. तुम्ही खेळलं पाहिजे, फिरलं पाहिजे, खूप खूप वाचलं पाहिजे.
अर्थात यात तुमचं काही चुकत नाही म्हणा , यात चुकता आमचाच. मोठ्या माणसांचा. काय आहे कि आता आई बाबा दोघीही नौकरी करत असतात. मग कुणी कुणाकडे जायला आणि यायला वेळ आहे कुणाला. सारे आपले चार भिंतींचे गुलाम झालेले.

पण मी जातो हो मुलांना घेवून गावी. खुपदा नाही पण निदान वर्षातून एकदा तरी. तेव्हा आमच्या जयूरानीला ( खरा राजा हा ! ) पडलेले प्रश्न फार मजेशीर आहेत.
बाबा एवढा ओझं घेवून चालताना बैलांच्या पायांना त्रास नाही का हो होत ?
होतो ना. – मी.
मग त्यांच्यासाठी कुणी बूट का शिवत नाही ?
मी निरुत्तर
आमची बैलगाडी वाड्याहून निघाली. मी खरा तर बैलांला कोणतीच दिशा देत नव्हतो पण तरीही आमची गाडी बरोबर आमच्या शेताकडेच चालली होती. याचाही आमच्या चिरनजीवांना आश्चर्य वाटत होता.
बाबा ते कसे काय बरोबर आपल्या शेताकडेच चालले आहेत.
अरे रस्ता पाठ झाला आहे त्यांला- मी
आपलं घर, आपलं शेत, आपली माणसं हि आपुलकीची भावना जनावरांच्या मनातही असते. पण आपण माणसं मात्र या भावनेला पारखे होत चाललो आहोत. यातून आपण बाहेर पडायलाच हवं.
आपल्यातल्या आपुलकीच नातं अधिक पक्कं करायला हवं.
मग चला तर टि व्ही समोरून उठा. निघा मामाच्या गावाला. आणि आल्या नंतर सांगा मला तिथ तुम्ही काय काय गमती जमती केल्या ते.

झाडासाठी टोपी………




मित्रांनो,
खूप दिवस झाले तुमची परीक्षा संपून पण मी तुम्हाला भेटलोच नाही. रागावलात ना माझ्यावर? सॉरी. काय हे, अजूनही राग जात नाही ? ठीक आहे शिक्षा करा मला.
काय करू ? कान धरू का ? उठाबशा काढू का ? कि कोंबडा होऊ ?

काय, म्हणालात कोंबडा होऊ ?

ठीक आहे कोंबडा होतो.

आवाजही काढू .

ठीक आहे.

कुकु s s s चुकू

काय मस्त हसलात सगळे

हा तर गेल्या महिन्यात तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र आत्ताच पेटीत टाकलं आणि पुन्हा लिहियला बसलो.

हो ! आधी पेपर कसे गेले सांगा. सगळ्यानला सोप्पे गेले. व्वा ! मग आता काय मजा करताय ? काय, सुट्टीअसूनही मजा येत नाही. खूप उन असतं म्हणून कोणी घराबाहेरच जावू देत नाही. बाहेर गेलं तरी फक्त पाण्यातपोहवास वाटत, नाहीतर झाडाखाली बसावसं वाटत.

झाडाखाली बसल्यानंतर खूप गार वाटत नाही ! पण आपल्याला अशी गार सावली देणाऱ्या झाडाला उन्हाचा कितीत्रास होत असेल याचा कधी विचार केलात ? नाही ना ? हो नाहीच करत आपण कधी असा दुसऱ्याला होणाऱ्यात्रासाचा विचार. आपल्याला सुख देताना दुसऱ्याला किती त्रास होत असेल याचा विचारही नाही शिवत आपल्यामनाला. अगदी आपले हट्ट पुरवताना आपले आई बाबा किती मेटाकुटीला येत असतील हे सुद्धा समजून घेत नाहीआपण.

पण, या कवितेतला मुलगा अक्कालरावाचा मित्र आहे. त्याला मात्र दुसऱ्याची खूप द्या येते. दिवसभर उन्हात उभंराहून आपल्याला सावली देणाऱ्या झाडासाठी एखादी टोपी शिवावी असं त्याला वाटतं. पण अशी टोपी शिवणाराशिंपी कुठे मिळणार ? असा प्रश्नही त्याला पडलाय. म्हणूनच तुम्हाला अजूनही झाडाच्या डोक्यावर टोप्या दिसतनाहीत.

अक्कलराव आणि हा छोटू अजूनही अशी टोपी शिवणाऱ्या शिंप्याच्या शोधात आहेत. तुम्हाला अशी, एवढी मोठ्ठीटोपी शिवणारा शिंपी कुठे भेटला तर अक्कालरावाला नक्की कळवा.