सचिननं भारतरत्न किताब परत करावा

bharatrtnaसचिनला भारतरत्न म्हणून गौरविण्यात आलं. सचिनच्या लाखो चाहत्यांना सचिनच्या खेळात स्वारस्य होतं. सचिनला भारतरत्न दिला जावा असं खरंच त्याच्या चाहत्यांना खरंच वाटत नसावं . कारण Continue reading

सचिन नक्कीच शतक करेल

 

sachin tendulkar

sachin tendulkar

                                                                                                                  

सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ……… Continue reading

हीच का आमची लोकशाही ?

( कुणाला बदनाम करणं हा हेतू नाही या सगळ्याचा. पण यातला व्हीडीओ आणि त्यातल्या स्ट्रिपलाईन हा पुरावा आहे.)

यावेळी खऱ्या अर्थानं माझा राजकारणाशी संबंध आला. मागच्या दोन्हीवेळी मी किनाऱ्यावरचा प्रवासी होतो. म्हणजे प्रवाहात झोकून द्यायची इच्छा नव्हती असं नाही. पण नौकरीच्या पाशात अडकलेलो होतो. त्यातही आणखी प्रोडक्शन म्यानेजर. म्हणजे घाण्याटला बैल म्हणा किंवा घाण्यातले शेंगदाणे म्हणा. सुटका नाही. पण यावेळी ते जू  ( बैलगाडीला किंवा नांगराला जुंपताना बैलाच्या खांद्यावत असता ते.) आधीच झुगारून दिला होतं. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माझी बहिणीला नगरसेवक या पदासाठी शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. आणि मला प्रचार मोहिमेसाठी पुरसा वेळ देता आला.

खरंतर निवडणुकीच्या आधी चारसहा महिन्यांपासून या प्रकाराकडं मी लक्ष ठेवून होतो. हे मी केवळ आमच्या मतदार संघापुरतं बोलत नाही. सगळ्याच मतदार संघात दिवाळीपासून मतदारांच्या घरी पोहचणारे मिठीचे पुडे आणि भेटवस्तू पहाता होतो. वर्तमान पत्रातूनही त्याविषयी खूप काही लिहून येत होतं. पण निवडणुकीच्या आधी महिनाभर मी आमच्या प्रभागात पोहचलो आणि मला फार जवळून सारं काही पहाता आलं.

उमेदवारांनी पैशाची मस्ती चढलेली असते असते आणि गरीब मतदारांना एका मतासाठी मिळणाऱ्या हजार दोनहजार रुपयांचं व्यसन लागलेला असतं. हा पैसे घेवून मत देणारा मतदार आता एवढा धाडसी झालाय कि तो प्रत्येक उमेदवारांकडून मतागनिक मिळणारे पैसे तो घेतोच पण समजा एखाद्या निवडून येण्याची दाट शक्यता असलेल्या एखाद्या उमेदवाराकडून त्याला पैसे मिळाले नाहीत तर तो त्या उमेदवाराला सरळ सरळ पैसे मागायलाही कमी करत नाही. अगदी मीसुद्धा यातून गेलो आहे. पण पैशापुढे आमची अक्कल चालू शकणार नव्हती. आम्ही हतबल असायचो. मग मी उपदेशाचे चारसहा डोस पाजून त्या गृहस्थांचं मन वळविण्याचा प्रयत्न करायचो.

आमच्या प्रभागात गेल्यावेळी नगरसेविका असलेल्या महिला उमेदवाराची एक हस्तक पैसे वाटताना पकडली गेली. त्या हस्तक बाईन मला अमक्या अमक्या उमेदवाराच्या नवऱ्यानं पैसे आणून दिल्याचं सांगितलं. पोलीस आले. पंचनामा झाला. दोषींना अटक झाली. टिव्ही वर बातमी झळकली. सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रांनीही या बातमीला स्थान दिलं. पण फरक काय पडला. ती उमेदवार उजळ माथ्यानं हिंडत होती. इतकाच काय तर दोन हजारांपेक्षा अधिक मतदान घेवून ती तीन क्रमांकावर राहिली. आणि दोन आणि तीन या क्रमांकावरील उमेदवारांच्या मतात फरक फोटा तो केवळ १५ मतांचा. म्हणजेच एवढा घडूनही तला मतदारांनी नाकारला असं म्हणता येणार नाही.

आणखी एका ठिकाणी तर तमाशातल्या फडात नाचणाऱ्या ललनेवर मिशीला पीळ मारत दोघांनी पैसे उध्ळवेत तसे एकाच मतदारावर त्या प्रभागातील दोन उमेदवारांनी पैसे उधळल्याची बातमी वर्तमान पत्रातून झळकली होती.

उमेदवारी हवी असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये असा संकेत आहे. पण ऐन निवडणुकीच्या काळात गुंडगिरीने वागणाऱ्या आणि दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेस्वरांना कोण शासन करणार.

हे दोन्ही प्रकार माझ्या अवतीभोवती घडलेले. सहाजिकच मी एक निनावी अर्ज लिहिला. त्यात आमच्या विरोधातील उमेदवाराने पैसे वाटल्याच्या आणि आणखी एका प्रभागातील दोन उमेदवारांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेचा उल्लेख केला आणि सदर अर्ज घेवून आमच्या महानगर पालिकेच्या निवडणूक आयुक्तांना भेटलो. आणि या दोन्ही ठिकाणच्या या दोषी उमेदवारांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पण कसलं काय ! या संदर्भात कसलीही कारवाई करण्यात त्या अधिकाऱ्यानं असमर्थता दाखवली. प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तसा आम्हाला अधिकार नाही. हवा असेल तर तुम्ही मुंबईला जा.

हा पैशांचा पाऊस फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीतच पडला असं नव्हे काही. जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही हेच घडलंय. या प्रचारादरम्यान दोन दिवसांसाठी गावी गेलो. तेव्हा चुलत बहिण तिचं दुख सांगत होती. ‘ आरं बघणा इज्या त्या बाप्प्यान XXXदादाकडून अडीच लाख रुपये आणल्यात वाटायला आणि मला दिल्यात नुसतं हजार रुपय. आता माझ्यासारख्या शेळ्या मेंढ्या मागं फिरणाऱ्या बाईला जरा जास्त दिवू न्हाईत व्हाय. आमच्याकड काय जमीन जुमला हाय का ….आमचा ऊस जाणार हाय ? ”

आता सांगा कसं हिला लोकशाही म्हणायचं.

इंदिराबाईंनी भले तीस वर्षापूर्वीच ‘ गरिबी हटाव ‘ अशी घोषणा केली होती. पण आजतागायत गरिबी हटली नाही. आणि ती हटावी, समाज शहाणा व्हावा अशी कुणाचीच इच्छा नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची तर मुळीच नाही. कारण भुकेकंगाल शहरवासी आणि दरिद्री शेतकरी हीच त्यांची बलस्थानं आहेत. हेच आहे त्यांचं गठ्ठा मतदान.

ढाण्या वाघ आणि आण्णांचं उपोषण

खरा भारतीय, indian,

खरा भारतीय, indian,

मुंबापुरीत मच्छर फार झालेत. म्हणून हे मच्छराचं गुणगुणनं आहे असं समजून आमच्या ढाण्या वाघानं आपला पंजा आपल्याच कानाच्या दिशेनं फिरवला. पण मच्छराचा मागमूसही हाती न लागता जेव्हा त्यांच्याच पंजाचा त्यांच्याच कानाखाली जाळ निघाला तेव्हा ते समजून चुकले कि नाही हे मच्छराचं गुणगुणनं नाही, ही सिंहाची गर्जना होती.

मग डोळ्यावरची झापड बाजूला सारून डोळे किलकिले करत आज कितीतरी दिवसानंतर आमच्या ढाण्या वाघानं आजूबाजूला पाहिलं. पण आपल्याच शिनीच्या ( म्हणजे बरोबरीच्या. आठ दहा वर्ष मागं पुढं असली तरी एका शिनिचीच म्हणत्यात नव्हं ) वाघानं एवढी सगळा देश हादरवून टाकणारी गर्जना केली म्हणाल्यावर हा आमचा एवढे दिवस सुस्तावलेला वाघ एकदम खजील झाला. पण त्याच्या तोंडातून काही डरकाळी फुटेना.
पण उशिरा का होईना काल कसातरी आमच्या वाघानं जबडा उघडला. डरकाळी फोडली. पण डरकाळी नव्हतीच ती. संतापही नव्हता. कंटाळून जांभळी ( जांभई ) दिल्यासारखं वाटलं. काय म्हणाला काल आमचा ढाण्या वाघ माहिते आहे. आमचा म्हणतोय म्हणजे मी सेनेचा नाही बरं का. पटलं नाही हे आमच्या ढाण्या वाघाचा विधान. काय म्हणाला माहिती आहे तो ? तो म्हणाला – ” मला अण्णांच्या प्रकृतीची काळजी वाटते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावं. हवं असेल तर अरविंद केजरीवाल अथवा किरण बेदी यांनी उपोषणाला बसावं.”

व्वा वाघा तुझ्या नसानसातून हिंदुत्वाच आणि मराठी मातीचं वारं वाहत आहे हे आज पटलं. अण्णांशिवाय कुणी उत्तरेकडचं अथवा दक्षिणेकडचं असं उपोषणाला बसला असतं तर तू त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं. केवळ आपले अण्णा आहेत म्हणून तुझ्या नसानसातलं शांत झालेलं हिंदुत्वाच वादळ आज पुन्हा जागं झालं. पण ते वादळ इतका पोरकटपणा करेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

मागे एकदा त्या पवारांच्या अज्यानं तुझ्या क्रत्त्वा विशी सवाल उपस्थित केलं होता तेव्हा आम्ही त्याचा कोण समाचार घेतला होता. पण आज अण्णांच्या कर्तुत्वाला पाठबळ देण्याऐवजी तुम्ही त्यात भुंगा सोडायचा जो प्रयत्न केलाय तो अजिबात नाही आवडला आपल्याला. अहो अर्विडचा आणि किरणचा नाव घेण्या ऐवजी एखदा म्हणाला असता, ” अण्णा तू लढायचं तर तू लढ. पण उपोषण सोड. आणि उपोषण चालू ठेवायचाच असेल तर त्या अर्विडला आणि त्या किरणला नको नको बसवू उपोषणाला. फक्कड बोलतोय तो अरविद. उपोषणासाठी जर कुणी गडीच पाहिजे असल तर मी माझा बछडा देतो ना पाठवून. पण तू उपोषण सोड.”

इंडियंस आर ग्रेट

हिदुस्तानात सम्राट अशोका पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक महात्मे होऊन गेले.

याच मातीत स्वात्यंत्र वीर सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, यासारखे हुतात्मे जन्मले.

याच मातीत रंगली बाजीराव – मस्तानीची प्रेम कहाणी.

ताजमहालच्या रुपात याच मातीवर उभी राहिली प्रेमाची निशाणी.

सत्तेसाठी हपापलेल्या सत्ताधुंद राजकारण्यांनी या मातीची हि ओळख पुसून टाकायचा अगदी चंगच बांधलाय.

पण तरीही या मातीची ओळख सांगणारे या मातीत निपजतातच. खेळाच्या मैदानावर तर हे प्रकर्षानं जाणवत.

मला आठवणारं सुनील गावस्कर हे त्यातलं पाहिलं नाव. अंपायरनं बोटवर करायच्या आधी मैदानातून परत फिरणारं.

सचिन तेंडुलकर हे आणखी एक नाव कुणाच्याही स्लेजिंगला उत्तर न देणारं. शतकांमागून शतकं करणारं. शतकांच शतक करू पाहणार.

खरंतर या विश्वकपमध्ये सचिनच्या शतकांच शतक व्हायला हवं होतं.

पण आफ्रिदी शिंकला. म्हणाला,” आम्ही सचिनचं शंभरावं शतक होऊ देणार नाही.” आणि खरंच त्यानं सचिनचं शंभरावं शतक होऊ दिलं नाही आणि खाली मान घालून निघून गेला.

हे सारं लिहिण्याला एक कारण झालं.

आजची आय. पी. एल. ची. म्याच.

रॉयल चायलेंज बंगलोर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्सची.

जिंकायला धावा उरलेल्या २.

मैदानात खेळताहेत ख्रिस गेल आणि विराट कोहली. गेल ९८ धावांवर. फलंदाजी करत होता विराट मनाचा कोहली. एक दोन वेळा १ धाव काढायची संधी होती. पण विराटनं ते टाळलं. आख्खं षटक निर्धाव खेळून काढलं. त्यात एक दोनदा बाद होता होतही वाचला. मध्येच एक चेंडू वाईड पडला. गेलची शतकाची संधी हुकते कि काय म्हणून विराटला वाईटही वाटलं. समोरच्या गोलंदाजाला त्यानं नाक मुरडलं.

षटक संपलं. गेलला स्ट्राईक मिळाली. त्यांना चौकार मारला. शतक केलं. विराट खूष.

तेव्हा आठवलं ‘ कुठं सचिनचं शंभरावं शतक होऊ नये म्हणून बिब्बा घालणारा आफ्रिदी आणि कुठं गेलचं शतक व्हावं म्हणून विजयी फटक्याचा मोह आवरून एक आख्खं षटक निर्धाव खेळून काढणारा कोहली.’

म्हणूनच म्हणतोय. ‘ इंडियंस आर ग्रेट ‘

क्रिकेटमधली अंधश्रद्धा

अंधश्रद्धा किती प्रकारच्या असतात !!!

साप दुध पितो.
नागाच्या डोक्यावर मनी असतो.
सर्प धनाचे रक्षण करतो.
सापाच्या अंगावर केस असतात.
मनोहर जोशींचा गणपती दुध पितो.
वडाच्या झाडावर भुतं रहातात.

अशा एक ना अनेक अंधश्रद्धा.

अशीच एक अंधश्रद्धा क्रिकेटमध्येही आहे. ती म्हणजे –

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘

अगदी एवढयात पार पडलेल्या विश्व चषकाच उदाहरण घ्या ना. उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यात आपण सचिनच्या शतकांच्या शतकाची आतुरतेनं वाट पाहत होतो. त्यासाठी मनोमन प्रार्थनाही करत होतो. पण आपली इच्छा काही फळाला आली नाही. सचिनचं शंभरावं शतक या विश्वचषकात पाहण्याचं भाग्य आपल्या नशिबी नव्हतं. पण पाकिस्तानला धूळ चारतानाच आपण श्रीलंकेलाही आस्मान दाखवलं. आणि मोठ्या दिमाखात विश्वचषक आपल्या घरी आणला.

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘ हे मी अनेकांच्या तोंडून ऐकलय. काही वेळा मी स्वतःही अनुभवलंय.

अगदी कालचीच घटना.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोची टस्कर्स सामना. सचिनचं २०-२० मधलं पाहिलंवहिल शतक. मुंबईचा १८२ असा मजबूत स्कोर. मुंबईन आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकलेले आणि कोचीला अजून खातं उघडायचं होतं. म्हणलं आता मुंबई जिंकणारच. पण कसलं काय कोचीन १ षटक राखून सामना जिंकला. झालं –
‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘ हि अंधश्रद्धा अधिक गडद झाली.

सचिनला भारतरत्न ???

सचिन महान आहे या विषयी मलाच काय पण जगात कुणालाही शंका असण्याचं काही एक कारण नाही. आज गानकोकिळा लतामंगेशकरांपासून आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह साऱ्यांनीच सचिनला भारतरत्न पुरस्कार द्यावा असा सूर लावलाय. पृथ्वीराज चव्हाणांच काय जातंय ? उलट या माध्यमातूनही ते त्यांच्या पदरी जनतेची सहानभूती पाडून घेणार आहेत. लता मंगेशकरांनी तर काय सचिनला स्वतःचा मुलगाच मानला आहे. आपल्या मुलाला भारतरत्न हा या देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळावा असं कोणत्या आईला वाटणार नाही ?

अगदी मलाही सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळावा असंच वाटत. पण भारतीय संविधानात तशी तरतूद नाही.

भारतीय संविधानात, ”   भारत रत्न हा किताब फक्त कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जावा. ” असं म्हटलं आहे.

पद्म विभूषण पुरस्कारात मात्र क्रीडाक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

या कायदेशीर बाबी बाजूला ठेवल्या तरी सचिनला भारत रत्न पुरस्कार देण्याची काही गरज नाही असं मला ठामपणे म्हणावसं वाटत.

त्याचं मुख्य कारण म्हणजे –
” सचिनला भारत रत्न देणं म्हणजे खऱ्या मोत्यावर कृत्रिम मुलामा चढवण्यासारखं आहे.”

दुसरी गोष्ट म्हणजे –
सचिनची कामगिरी खूप महान आहे. त्याला भारत रत्न पुरस्कार द्यायचा असेल तर कायद्यात बदल करायलाही हरकत नाही. पण एकदा का कायद्यात बदल झाला कि आमचे पुढारी खिरापतीसारखी त्या पुरस्काराची वाटप करत सुटतील. त्यामुळेच सचिनला हा पुरस्कार द्यायचा असेल तर कायद्यात बदल करण्याऐवजी आमच्या राष्ट्रपतींनाच या विषयी निर्णय घेऊ द्यावा.

आणखी एक गोष्ट अशी –
कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामगिरीतून समाज घडत जातो म्हणून अशा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देणं न्यायचं आहे. परंतु सचिनची कामगिरी त्या तोडीची नाही. सचिननं ज्या रीतीनं स्वतःची कारकीर्द घडवलीय आणि मैदानात इतरांसमोर जो आदर्श ठेवलाय त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. देशातले अनेक तरुण आपण सचिन व्हायचं असं स्वप्नं उराशी बाळगतील. पण आयपीएल आणि रणजीचा विचार केला तरीही अगदी मुठभर लोकांपुरताच हा परिणाम असणार आहे संपूर्ण समाजावर नाही.

शिवाय तरुण पिढी जेव्हा महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, टाटा, बिर्ला यासारख्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेवते तेव्हा त्याच्या परिणाम समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत होतो.

साहित्यक्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा हा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्या लेखकाच्या साहित्यकृतींनी संपूर्ण समाज ढवळून काढलेला असतो आणि समाजाला एक योग्य दिशा दिलेली असते.

सचिनची कामगिरीही समाज ढवळून काढणारीच आहे पण त्याच्या कामगिरीचा समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीवर होणारा परिणाम मात्र फारच मर्यादित स्वरूपाचा असेल.

नावारूपाला आलेल्या व्यक्तीला पुरस्कार देणं हे आता एक फ्याड झालं आहे.

म्हणूनच खरंतर या गोष्टीची देशभर एवढी चर्चा सुरु असताना सचिननं स्वतःच विनम्रपणे हा पुरस्कार नाकारायला हवा.

हा रडीचा डाव नाही

हो नाही करता करता भारतानं वर्ल्डकप जिंकला. नुसताच जिंकला नाही. दिमाखात जिंकला.
आपण पाकिस्तान विरुद्धची म्याच जिंकली तेव्हाच माझ्या मनात –

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकार घेवू लागल्या होत्या. हि सगळी कविता लिहित असताना एकीकडे अम्पायरनं बाद द्याच्या आधीच मैदानातून बाहेर जाणारा सचिन आठवत होता, आफ्रिदीचा अगदी झेपावत घेतलेला झेल आपण टप्पा पडण्यापूर्वी घेतला कि टप्पा पडल्यानंतर हे आपल्याला सांगता येणार नाही, हे अगदी निरागस बाळासारख सांगणारा नेहरा आठवत होता आणि दुसरीकडं मैदानातल्या अम्पायरनं बाद दिल्यानंतरही तिसरया अम्पायरच्या निर्णयाची वाट पहात मैदानात ताटकळत उभे रहाणारे इतर देशांचे कितीतरी खेळाडू मी पहात होतो. आणि या हिंदवी मातीच्या इमानीपणाची मला अधिक तीव्रतेन जाणीव होत होती.

अंतिम सामन्यात भारताचे दोन मोहरे झटपट बाद केल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी केलेला जल्लोषही आठवतोय आणि गंभीर – धोनीची जोडी फुटेना तेव्हा केवळ यांच्यावर दबाव आणावा एवढ्याच हेतूने केलेले कितीतरी अपील आठवताहेत.

१९९६ साली उपांत्य सामन्यात विनोद कांबळी रडला. २०११ श्रीलंका रडल्यासारखी दिसली नाही पण मनोमन रडत होती.

बस्स. २०१५ च्या वर्ल्डकप साठी धोनीच्या संघाला मनःपूर्वक. शुभेच्छा.

होय मी आजच सांगतोय. २०१५ चा वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत.

२०११ च्या विजयानिमित्त सचिनसह भारतीय संघाला अर्पण.

श्री विष्णूंचा नवा अवतार

( हा फोटो पहायला विसरू नका )

पाकिस्तानी गोलंदाज रियाझनं भारतीय संघाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाचवा बळी घेतला आणि भारतीय मातीवर नाक घासलं. म्हणाला, ” बाई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.”

खरंतर त्याला ” आई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.” असं म्हणायचं असावं. पण पाकिस्तानी संस्कृतीत एवढी शिकवण कुठली ?

नंतर कळलं कि तो मनोमन नमाज पढून आल्लाची करून भाकत होता.

आम्ही एवढे कर्मठ नाही तेच बरे आहोत. आमच्याही खेळाडूंना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे. शतक केलं किंवा बळी मिळाला कि तेही आभाळाकड पाहून त्या नियतीच्या विधात्याची मनोमन करुणा भाकतात. पण हे असले नखरे. छ्या ! तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास माझाही आहे. देवाच्या दारी गेल्यानंतर मीही त्याला खूप काही मागत असतो. हात जोडून त्या परमेश्वराला शरण जाताना मी त्याच्याशी काय बोलतो त्याविषयी नंतर लिहीन.

पण या रियाझच मात्र अतीच झालं होतं. मागे एकदा मी शोएब अख्तरलाही अशाच रीतीनं मैदानावर नमाज पढताना पाहिलं होतं  पण तेव्हा भगवान विष्णू थोडे धावपळीत होते.

पण आता………..आता मात्र भगवान विष्णूंना हे सहन झालं नाही आणि त्यांनी हिंदवी भूमीत नतमस्तक होत अल्लाची करून भाकणाऱ्या रियाझला चक्क दर्शन दिलं. तो हा विष्णूचा नवा अवतार.

जिंकणे हा धर्म अमुचा

पाकिस्तान सोबतची म्याच व्हायच्या आधी मी –

पैज लावताय ????

हा लेख लिहिला होता. आम्ही पाकिस्तानसोबतची म्याच लिलया जिंकली. पण तेव्हापासून माझ्या मनात –

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकाराला आल्या होत्या.

वर्ल्डकप सुरु व्हायच्या आधीपासून भारतीय संघ २८ वर्षांनतर पुन्हा इतिहास घडवणार आणि वर्ल्डकप खेचून आणणार असा मलाच काय पण तमाम भारतीयांना विश्वास होता. पण साखळी फेरीतली भारताची कामगिरी खूप ढिसाळ झाली आणि माझ्यासह अनेकांचा मनात शंकेची पाल चुकचुकली. देशविदेशातल्या तज्ञांनी आणि माजी खेळाडूंनी तर भारताला विजेतेपदाच्या स्पर्धेतून बादच करून टाकलं होतं.

पण वेस्ट इंडीज विरुद्धच्या विजयान भारतीय संघात नवचैतन्य निर्माण केलं आणि मग सतत तीन वेळा विश्वकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघान माती चारली आणि त्यानंतर परंपरागत शत्रू पाकिस्तानला मैदानातून हुसकून लावलं.

झालं. हा हा म्हणता फायनल आली. आणि समोर दहातोंडी रावणाचे वंशज.

पण श्रीरामाची परंपरा सांगणाऱ्या मातीला रावण काही नवीन नव्हता. आपला वध कधी आणि कसा झालं हे जसं रावणाला कळलं नाही तसंच श्रीलंकेच्या खेळाडूंनाही.

हे महायुद्ध सुरु व्हायच्या आधीपासून, ” आम्हाला सचिनसाठी वर्ल्डकप जिंकायचाय ” असं धोनीसह प्रत्येक खेळाडू म्हणत होता. आणि अंतिम सामन्यात सचिन लवकर बाद होवूनही आपल्या संघानं विश्वकप जिंकला आणि त्यांचे शब्द खरे करून दाखवले. प्रत्येक विजयात प्रत्येकाचाच वाट असतो. पण समजा या अंतिम सामन्यात सेहवाग शून्यावर बाद झालेला असताना सचिननं शतक झळकावत म्याच जिंकली असती तर इतर खेळाडूंना त्या विजयावर हवा तसा हक्क सांगता आला नसता.

पण २ बाद १९ या परिस्थितीतून सामना जिंकताना भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूनं आम्हाला सचिन विषयी किती आदर आहे हेच दाखवून दिलं…….आणि त्याच बरोबर दाखवून दिली भारतीय संघातील एकजीवाची ताकद.

सचिन तू आणखी एक वर्ल्डकप खेळावास एवढ बळ परमेश्वरानं तुला द्यावं.

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

ही कविता कशी पूर्ण झाली हे उद्या सांगेन.