बकरी ईद

तेरी हँसी के लिए गम कुर्बान
तेरी ख़ुशी के लिए आँसू कुर्बान
दोस्त
तेरी ख़ुशी के लिए जान भी कुर्बान
अगर…. Continue reading

खरे मित्र

friendship

friendship

आपण जन्माला आल्यापासून तिरडीवर चढेपर्यंत किती माणसं येतात आपल्या आयुष्यात. चढेपर्यंत म्हणण्यापेक्षा चढवले जाईपर्यंत म्हणू. चढवले जाईपर्यंत तरी कशाला म्हणायचं. तेव्हा कुणाला कसलाही विरोध करण्याचं त्राण तर नसतच आपल्यात पण काहीच उरलेलं नसतं आपल्या हाती.
पण ……….

Continue reading

तुझ्या चेहऱ्यामध्ये

तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असता त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात………….एका अदृश्य नात्यांना बांधले जातात……….कळत नकळत एकजीव होतात. तो तिचा सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवा असता स्वच्छ………मोकळं………निरभ्र. Continue reading

प्रेमाहुनी जगी या

स्टार प्रवाहवर नवी सिरीयल येतेय. ” स्वप्नांच्या पलीकडले.”

त्या सिरियलची जाहिरात सध्या जोरात चालू आहे. ती म्हणते, ” माझ्या बाबांना ना मक्याचं कणीस फार आवडतं. ते ना त्या कणसंवाल्याला त्याच्या गाडीसकट विकत घेतील आणि बंगल्याच्या आवारात नेऊन उभं करतील.”

तो म्हणतो, ” ती उंच इमारत दिसतेय ना. असं वाटतं, त्या इमारतीवर जाऊन उभं रहावं आणि खालून जाणाऱ्या माणसांकडे मुंग्यांसारख पहावं.”

यावर ती म्हणते, ” काय भन्नाट विचार आहेत रे तुझे ! ”

यात Continue reading

तुझ्यासाठी

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. विसरतो आपला राग. पसरतो पंख आणि ती विसावते पुन्हा एकदा आपल्या कुशीत.

काय म्हणायचा याला ? प्रेम …… कि …… तडजोड ?

कारण या दोन्ही गोष्टी होत नाहीत तेव्हा दोघांच्या दोन दिशा ठरलेल्या. मध्ये एक अदृश्य भिंत. दोघांमध्ये विसंवाद निर्माण करणारी नव्हे. दोघांमधला संवाद दडपून टाकणारी. म्हणूनच खूप गरजेचा असतं अशी भिंत उभी रहाण्या आधीच जमीनदोस्त करण्याची. या आणि अशाच भावना व्यक्त करणारी हि कविता –

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

तू शराब होऊन चढलेली

प्रेम हि केवढी प्रचंड भावना आहे. आपल्या आयुष्यातली. तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे सुरांशिवाय गाणं……..तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे हरवलेलं चांदणं. ती असते आपल्या आयुष्याला कुठल्याशा एका वळणावर पडलेलं स्वप्नं.  आपल्याही नकळत ते स्वप्नं साक्षात उतरतं………आपल्याभोवती प्रेमाचं चांदणं भिरभिरतं. अळवाच्या पानावरचा थेंब जपावा इतक्या हळूवारपणे तिच्यासोबतच प्रत्येक क्षण जपावासा वाटतो…….. ती नसते सोबत तेव्हाही आपल्याला तिचा सहवास लाभतो.

ती दाही दिशात……..ती आपल्या प्रत्येक श्वासात.
पानाफुलात तिचं हसू……..तीच लागते स्वप्नात दिसू.
ती भुईमधुन उगवणारा अंकुर…….ती जखमेवरची फुंकर.
ती शराब होऊन नसानसात भिनलेली………ती पैंजण होऊन आपल्या आयुष्यात रुणझुणलेली.
ती जशी सखी असते आपली तशीच मूर्तीमंत देवताही असते आपल्या आयुष्यातली.

अशाच भावना मनात असणारा या कवितेतला तिचा सखा म्हणतोय, ” तू माझ्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक दिसेल मला तूच दिसतेस. तूच प्रत्येक पानाफुलातून हसतेस. भुईमधुन नुकत्याच अंकुरणाऱ्या कळीनं दवबिंदुना मिठीत घ्यावं एवढ्या निरागसतेनं तू मला कुशीत घेतेस.

तू नुसतीच सुखात सोबत करत नाहीस मला तर जेव्हा मी संकटात सापडतो तेव्हा तूच मला पैलतीराला नेणारी नौका होतेस. म्हणूनच तू नुसती सखी नसतेस माझी तू असतेस माझी मूर्तीमंत देवता. तू जगण्यातली गोडी….तू सुखाचे सर…….आणि तूच होय तूच माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या राशी.”

प्रेम, प्रेम कविता

प्रेम, प्रेम कविता

ती खरंच पावसासारखी.

ती म्हणजे खरंच पावसासारखी.

ती म्हणजे  खरंच पावसासारखी
थेंबा थेंबाने  येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच

पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.


आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा पावसात हरवून जातो.

तळहातावर ती, बाहेरही ती, आपणही स्वतःला झोकून देतो 
आपल्याही नकळत खिडकीतून बाहेर जातो.
ती रिमझिमणारी सर, आपण मुसळधार पाऊस होतो.
तिच्यासह अवताल भवताल सारं सारं कवेत घेतो.

पाऊस

पाऊस

हिरवी राने, हिरवी पाने, हिरव्या वेली, हिरवी मने
हिरव्या हिरव्या हिरवाईतून टपटपणारी दोन जणे
कोणती ती आणि कोणता मी, ओळखत नाही आता कोणी
आई म्हणते, ” काय रे घरात आले कोठून पाणी ?”

दचकून तेव्हा मी माझ्या पायाशी पहातो 
पाणी नसतेच तिथे मग भांबावून जातो
माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या तिला आई पहात रहाते
कुठल्यातरी कौतुकानं माझ्या हाती चहा देते.

खिडकीमधून रिम झिमणाऱ्या पुन्हा तिला पहात रहातो
चहावरची वाफ होतो खुशाल तिच्या कवेत जातो.

मी तुझ्या श्वासात आहे

स्त्री तिचं पाहिलं प्रेम कधीच विसरत नाही असं म्हणतात.पण खरंतर स्त्रीच काय कोणतीही व्यक्ती आयुष्यात कोणतीही घटना कधीच विसरत नाही. प्रेम तर कधीच विसरता येत नाही.

आणखी एक गोष्ट जगात कुणाचंही प्रेम डोंगर उतारावरून एखादा दगड घरंगळत पायथ्याशी यावा इतक्या सहजपणे प्रेम कधी शेवटला जात नाही, किनाऱ्याला लागत नाही. अनेक अडचणी………कधी घरच्यांचा विरोध……..कधी समाजाचे शिंतोडे………कधी परस्परातले गैरसमज………..कधी वैचारिक मतभेद……….कधी अपेक्षांच्या कठपुतळ्या. एक ना अनेक हजार अडचणी.

या सगळ्यातून तरून किनाऱ्याला लागणारं प्रेम एखादंच. इतर सगळ्याच्या पदरी एक हुरहूर. भोवतीने आठवणींचा पसारा. त्या आठवणींनी व्याकुळ होणारं काळीज. मग मनात आकार घेणाऱ्या ओळी. आपल्या प्रेमावरचा विश्वास पाहून आपल्याच ओठावर फुलणारं हसू.

अशाच या ओळी. तिच्या मनात आकार घेणाऱ्या. खरंतर तिची केवढी भक्ती त्याच्यावर. केवढं प्रेम. पण नात्यागोत्यांच्या झटापटीत तिला तिच्या प्रेमाचा हात सोडवा लागतो.आयुष्याचं दान दुसऱ्या कुणाच्यातरी ओंजळीत द्यावं लागतं. ती तिथंही रमून जाते. चोहो अंगानं आयुष्य फुलवण्याचा प्रयत्न करते. पण कधी तरी मनात अशा ओळी आकार घेतात –

प्रेम कविता

प्रेम कविता

श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?”

किती दिवस झाले तुझं पत्र नाही………फोन नाही………..अगदी साधा यस एम यस नाही. रागावलीस ना माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू ‘ मैत्री ‘ म्हणत होतीस त्याच नात्याला मी ‘ प्रेम ‘ म्हणालो म्हणून ? तसं असेल तर मला कीवच करावीशी वाटते तुझी. कारण ना तुला ‘ मैत्री ‘ चा अर्थ कळलाय आणि ना ‘ प्रेमा ‘ चा. अगदी तू म्हणतेस त्याप्रमाणे तू मैत्रीण असतीस ना माझी तर मी ‘ तुझ्या माझ्या नात्याला ‘ ‘ प्रेमा ‘ चं नाव दिल्यावर तू अशी रागावली नसतीस माझ्यावर.

प्रेम आणि मैत्रीत काय फरक आहे माहिती आहे तुला ? मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं बऱ्याचदा पण प्रेमातून मैत्रीचा सूर उमटेलच असं नाही सांगता येत काही. प्रेमातून बऱ्याचदा आकाराला येतो अधिकाराचा अंकुर. आता तू म्हणशील, ” मग श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?”

खरं सांगू ! असं नाही सांगता यायचं काही. पण एवढ नक्कीच सांगेन कि प्रेमाच्या पातळीपर्यंत जाऊन केलेली मैत्री नक्कीच श्रेष्ठ.

तू म्हणशील, ” म्हणजे कशी ? ”

आभाळासारखी आणि मातीसारखी. क्षितिजाशी पाहिलं तर एकरूप झालेली. प्रत्यक्षात मात्र नेहमीच एक अंतर राखून असलेली. कुणाच्या भीतीनं नव्हे………..एक मर्यादा म्हणून.

आता तू म्हणशील, ” मग प्रेम कसं असतं ? ”

प्रेम असतं असतं नदी आणि समुद्रासारखं………मिलनाची आस असलेलं.

मला माहिती आहे यावर तू काय म्हणणार आहेस ते. आता तू म्हणशील, ” बस्स s s s !!! एवढंच ! प्रेम म्हणजे मिलनच का फक्त ? ”

नाही ! प्रेम म्हणजे मिलनच नाही काही. प्रेमाला आणखी एक पदर असतो. श्रद्धेचा !!!!

होय !!!! श्रद्धेचा. ईश्वरावर असावी तशी श्रद्धा.

म्हणूनच मला मीरा हीच खरी प्रेयसी वाटते कृष्णाची. प्रसंगी कृष्णासाठी वीष प्राशन करणारी ………पण कृष्णाशी एकरूप होऊ पहाणारी . आपण मात्र म्हणतो, मीरेची भक्ती होती कृष्णावर. पण श्रद्धा आणि भाक्तीतला फरक स्पष्ट करता येईल कुणाला ?

पण आजकाल प्रेमातल्या श्रद्धेच्या या जरतारी पदराची जाणीवच नसते कुणाला. सौन्दर्य……….त्याची ओढ………त्याचं आकर्षण…………त्याची आसक्ती………आजकालच्या प्रेमाची एवढीच झेप.

मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते, हेच ना, ” तू जर मीरेला प्रेयसी म्हणतोस कृष्णाची तर मग राधा कोण ? ”

मी राधेला मैत्रीण मानतो कृष्णाची………रासक्रीडे पासून शृंगारापर्यंत कृष्णाला सोबत करणारी , साथ देणारी……….प्रत्येक पावलाला त्याला समजून घेणारी. आणि म्हणूनच राधेन मैत्रीची सीमा कधी ओलांडली आणि ती कृष्णाची सखी कधी झाली हे कळंलच नाही आपल्याला. आणि आपण करत राहिलोत एकंच जप , ” राधे – शाम………राधे – शाम……..राधे – शाम.”

कळलाय तुला प्रेम आणि मैत्रीतला फरक ?

ती आणि पाऊस

पावसाळ्याचे दिवस. काळे ढग….. गार वारा आणि तिची वाट पाहत थांबलेला तो. कित्ती वेळाची वाट पाहतोय तो. पण ती येत नाही. पाऊस मात्र बरसतोच आहे रिम झिम. आभाळातून आणि त्याच्या डोळ्यातूनही. फार फार राग येतो त्याला तिचा. नेहेमीच उशीर. उशीर करायचा आणि ओठावर एक गुलजार, खट्याळ हसू घेऊन यायचं. तिचं ते खट्याळ हसू पाहिलं कि तोही तिला झालेला उशीर……त्याच्या जीवाची झालेली तगमग सारं सारं विसरून जायचा. फक्त तिचा तिचा व्हायचा. स्वतःचं अस्तित्व विसरून तिच्या डोळ्यात बुडून जायचा.

पण आज मात्र वाट पहाण्याची परिसीमा होते. पण तिची चाहूलही लागत नाही कुठे वाटेवर. पाऊस मात्र बरसात असतो त्याच्या डोळ्यातून अन आभाळातून. तेव्हा त्याला वाटतं तिच्या पेक्षा पाऊसच बरा. तो नेहमीच आपली सोबत करतो. ती सोबत असते तेव्हाही आणि ती सोबत नसते तेव्हाही. म्हणून तो म्हणतो –

 पाऊस, प्रेम कविता, love poem, पावसाच्या कविता
पाऊस, प्रेम कविता, love poem